कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | सातारा सप्टेंबरनंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. पण, शासनाकडून अद्याप मदतीची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ पंचनामे आणि आकड्यांचाच खेळ सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २४ हजार ७०० शेतकरी मदत निधीच्या प्रतिक्षेत आहेत. ऑक्टोबरमध्ये ७४२० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. आता हिवाळी अधिवेशनापूर्वी तरी शेतकऱ्यांना मागील मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.