कृषीसेवक | ३० सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर पावसाचे संकट कायम असतांना आता ऊस उत्पादक शेतकरी संकटात आल्याने एका शेतकऱ्याने चक्क भाजप नेत्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतो असा थेट इशाराच शेतकऱ्यानं दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
टोकाई सहकारी साखर कान्याखान्याची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात ज्या शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाला त्या शेतकऱ्याचे पैसे अजूनही साखर कारखान्याकडे थकित आहेत. ते पैसे मिळावे यासाठी आज या सभेमध्ये एक शेतकरी चक्क पेट्रोलची बॉटल घेतात घेऊन दाखल झाला होता. जर पैसे मिळणार नसतील तर मी आत्महत्या करतो आसा पवित्रा यावेळी या शेतकऱ्याने घेतला होता. टोकाई सहकारी साखर कान्याखान्यावर आता भाजपचे नेते शिवाजीराव जाधव यांची सत्ता आहे. चेअरमन पदावर ते स्वतः विराजमान झाले आहेत. या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची तब्बल 29 कोटी रुपयांची FRP थकीत आहे. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे.