कापूस बियाणे खरेदी करताना सावध – कृषी विभागाचा शेतकऱ्यांना इशारा !

१८ लाख रुपयांचे बनावट कापूस बियाणे जप्त !
बातमी शेअर करा

कृषी सेवक । ९ एप्रिल २०२४ । आताच्या खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी आणि मशागतीसाठी तयारी सुरु झाली आहे. अनेक शेतकरी बांधव सध्या चांगल्या कापूस बियाण्यांच्या शोधात असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, यात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. कारण ऐन हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्यांच्या सुळसुळाट होण्याची दात शक्यता आहे. त्यामुळे बियाणे खरेदी करताना निष्काळजी केल्यास शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

शेतकरी सन्मान योजनेतील पीक कर्जमाफी संदर्भात १५ दिवसांत निर्णय च्या! – उच्च न्यायालय

महाराष्ट्रात दरवर्षी शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे आपल्या राज्यात येते. विशेष बाब म्हणजे मध्यवर्ती भाग असल्याने प्रशासनाला त्यावर नियंत्रण मिळवणे देखील अवघड जाते. मागील महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यातच अहेरी येथे महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने छापा टाकून १८ लाख रुपयांचे बनावट कापूस बियाणे पकडले होते. आता, येत्या खरीप हंगामात बियाणे खरेदी करताना बॅच क्रमांक पाहून, पक्के बिल न घेतल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी दरम्यान ही काळजी घ्यावी, असे देखील कृषी विभागाने म्हटले आहे.

शेतकरी पुन्हा संकटात; सोयाबीन बियाणे किमतीत मोठी वाढ !

यावर्षी एप्रिल महिन्यापासूनच बनावट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी करताना बियाण्याची गुणवत्ता व कंपनीबाबतची विश्वासार्हता या बाबी तपासणे अगदी गरजेचे आहे. तसेच, कोणी बनावट बियाणे विक्री करत असेल तर तत्काळ कृषी विभागाला माहिती द्यावी. संबंधित तक्रारदार शेतकऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन देखील कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना गुणवत्तेबाबत तडजोड करु नये व फसवणूक झाल्यास विनाविलंब तक्रार करावी, असे आवाहनही विभागाने केले आहे.

 

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment