कृषी सेवक | ३१ ऑक्टोबर २०२२ | |यापूर्वी झालेल्या पावसामुळे गुजरातसह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थानमधील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. हजारो एकरात लावलेली पिके पाण्यात बुडाल्याने उद्ध्वस्त झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी होत आहे.
दरम्यान, 2022 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी गुजरात सरकारने शुक्रवारी मदत पॅकेज म्हणून ६३० कोटी रुपयांची घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेचा 8 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तात्काळ लाभ होणार आहे.