मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन : बांबू लागवड अनुदान योजना

बातमी शेअर करा

कृषीसेवक | ७ नोव्हेबर २०२३

पर्यावरण संतुलनासाठी हातभार लागावा म्हणून तसेच शेतकऱ्यांना एक निश्चित उत्पन्न मिळावे, यासाठी बांबू लागवड अनुदान योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. बांबूपासून अनेक वस्तू तयार होतात. याशिवाय इथेनॉल निर्मितीसाठीही त्याचा मोठा वापर होतो. बांबू लागवडीद्वारे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

paid add

मुख्यमंत्री दोन दिवसीय सुट्टीसाठी आपल्या मूळगावी आले होते. यावेळी गावातील वृक्षारोपण कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांना समूह शेती करत बांबू लागवड करण्याचे आवाहन केले. बांबूचा उपयोग शेतीच्या कामासाठी तसेच बांधकामासाठी होतो. बांबूपासूनच अनेक वस्तू तयार केल्या जातात. बांबूपासून खेळणे, चटई, फर्निचर, सजावट सामान, टोकऱ्या, भांडे आणि पाण्याची बॉटल यांची मागणी जास्त आहे. डोंगराळ भागात बांबूपासून घर बनवले जाते. त्यामुळे बांबू हे शेतकऱ्यांसाठी मोठे उत्पन्नाचे साधन असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

बांबूपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल निर्मिती केली जाते. त्यातून अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो. एक हेक्टर ऊस शेतीसाठी 2 कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर एक टन उसापासून 80 लिटर इथेनॉलची निर्मिती होते. याउलट एक हेक्टर बांबूसाठी 20 लाख लिटर पाण्याची आवश्यकता असते. तर एक टन बांबूपासून 200 लिटर इथेनॉलची निर्मिती होते. त्यामुळे बांबू हे उत्पन्नाचे मोठे साधन असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले. याशिवाय उसाचे हेक्टरी 100 टन उत्पादन होते तर त्यास 2500 रुपये प्रति टन दर मिळतो. याऊलट बांबू लागवडीतून हेक्टरी कमीत कमी 200 टन उत्पादन मिळून त्यास प्रति टन 4000 हजार रुपये दर मिळतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम