लाल्या रोगावर असे मिळवा नियंत्रण !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २२ ऑगस्ट २०२३ | राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कापूस पिक घेतले असून अनेकदा कापूस पिकाची पाने लाल झालेली दिसतात. त्यालाच लाल्या रोग असे म्हणतात. लाल्या रोगामुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकरी चिंतेत आहे. या रोगाची लक्षणे काय आहेत? रोग येण्याची कारणे कोणती अन त्यावर उपाययोजना काय कराव्यात याबाबत आम्ही तुम्हाला या लेखातील माहिती देणार आहोत.

कपाशीची पाने टोकाकडून कडेने पिवळी पडतात. त्यानंतर पानांमधील हरिद्रव्य नष्ट होते. त्यानंतर कापूस पिकाची पाने लाल होण्यास सुरुवात होते. प्रादुर्भाव झालेली पाने गळून पडतात. तसेच कपाशीची पाने, फुले गळून पडतात.

paid add

कापूस पीक घेण्यापूर्वी शेतामध्ये उस, केळी, मका ही जास्त अन्नद्रव्य घेणारी पिके घेतल्यानंतर त्या जागी कपाशीची लागवड केली असेल तर कपाशी पिकाला अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. पिकांची फेरपालट न करणे, हलक्या जमिनीत कपाशी घेणे, पिकाला पाण्याचा जास्त ताण पडणे किंवा जमिनीवमध्ये जास्त पाणी साचणे.
कापूस पिकाची योग्य वेळेत पेरणी करावी. दिवसाचे तापमान ४०°c पेक्षा कमी असल्यावर व ७५ मि.मी. पाऊस झाल्यावर पेरणी करावी. पेरणी अगोदर जमिनीत शेणखत मिसळावे. झाडाच्या गरजेनुसार सिंचनाचे नियोजन करावे. लागवडीसाठी योग्य अंतर असणे आवश्यक आहे. माती परीक्षण करून पिकाला खताची मात्रा देणे आवश्यक आहे. पिक काढणीनंतर खोल नांगरट करून घ्यावी.

१) कपाशी पिकावर एक टक्के युरियाची फवारणी करावी. म्हणजेच १५० ग्रॅम युरिया १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२) ५० ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
अशाप्रकारे कपाशीमध्ये लाल्या रोगाचे नियंत्रण केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम