कृषी सेवक | ५ नोव्हेंबर २०२२ | सध्या बाजारात डाळिंबाची आवक थोडी कमी झालेली असल्याने राज्यातील बाजारपेठांमध्ये डाळिंबा दरामध्ये घसरण जाणवत आहे. डाळिंबाच्या गुणवत्तेवर पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे परिणाम झाला. त्यामुळे अशा डाळिंबाला मिळणारा दरही घसरला आहे. . राज्यात बाजार समित्यांमध्ये आवक होणाऱ्या डाळिंबाची सरासरी ५ हजार ते ८ हजार रुपयाने विक्री होत आहे. दर्जेदार डाळिंबाला चांगला दर मिळत आहे. मात्र अशा डाळिंबाचं प्रमाण कमी आहे. डाळिंबाचे दर पुढील काही दिवस असेच राहू शकतात, असे जाणकार व्यक्तींनी म्हटले आहे.