शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना युद्धपातळीवर अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ९०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पहिल्या टप्प्यात सुरु झाले आहे.
महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पातून १७० उपकेंद्रांना वीजपुरवठा होणार आहे, ज्यामुळे शेतीपंपांना दिवसा वीज मिळणार आहे. उपकेंद्रांच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा मिळणार असल्याने संबंधित गावांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या योजनेतून सहभागी ग्रामपंचायतींना तीन वर्षांत १५ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ७०७ उपकेंद्रांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे नियोजन केले गेले आहे. यासाठी ५ हजार ८७७ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे लक्ष्य असून, ५ हजार ३४४ एकर शासकीय जमिनींचे अधिग्रहण झाले आहे.
योजनेचे फायदे
– दिवसा वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळेल.
– सुमारे ३० हजार कोटी रुपयांची विकेंद्रित गुंतवणूक होईल.
– ६ हजार पूर्णवेळ आणि १३ हजार अर्धवेळ रोजगार निर्माण होणार आहेत.
– सौरऊर्जा प्रकल्प उभारणीमुळे ग्रामपंचायतींना २०० कोटींहून अधिक अनुदान मिळेल.
पहिल्या टप्प्यातील सौर ऊर्जा निर्मिती
या योजनेमुळे सोलापूरसह ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ग्रामपंचायतींच्या जनसुविधा सुधारतील.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम