राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १५ ऑक्टोबर २०२३

राज्यातील लाखो शेतकरी अनेक प्रकारचे शेतात पिक घेत असतात, त्यामुळे प्रत्येक भागात नेहमी प्रमाणे पाऊस पडेल असे नसते, काही ठिकाणी कमी पाऊस झाल्याने शेतकरी संकटात येत असतो तर काही भागात पाऊस झाल्यावर देखील अनेक रोगांच्या समस्यामुळे शेतातील पिक उपयोगात येत नसते. त्यामुळे देखील राज्यातील शेतकरी हतबल असतो. यंदा सोयाबीन पिकावर आलेल्या रोगामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादनात घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करत आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात होती.

मात्र आता राज्य सरकारने निर्णय घेत शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पण यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीनची सवंगणी केली आहे. यामुळे आता सवंगणी केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे कसे होणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगासह येलो मोजॅक, मुळकूज, खोडकूज हे रोग आले होते. यामुळे सोयाबीन हे पिवळं पडत उत्पादनात मोठी घट होणार आहे. शेतकऱ्याने लावलेला खर्चही निघणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. अशातच सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देताच सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी आपला सोयाबीन काढलाय अशाचे कसे पंचनामे होणार हा प्रश्नच आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ३२ हजार ५३३ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. यापैकी ९० हजार १६६ हेक्टरचा पीक विमाही शेतकऱ्यांनी काढला आहे. पंचनामे झाल्यावर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातं आहे. राज्य सरकारने सोयाबीनच्या नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने संयुक्त पंचनामे करावेत, असे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत दिले होते. त्या अनुषंगाने ९ तारखेला राज्याच्या वन आणि महसूल विभागाने सोयाबीनचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम