रब्बी हंगामासाठी ३१ डिसेंबर पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांचे अधिपत्याखालील जळगाव जिल्हा लाभक्षेत्रातील बोरी मध्यम प्रकल्प, भोकरबारी मध्यम प्रकल्प तालुका पारोळा, मन्याड लघु प्रकल्प बोळा, सावखेडा, म्हसवा, पिंपळकोठा भोलाणे शिरसमणी तालुका पारोळा, निसर्डी तालुका अमळनेर, मन्यारखेडा, विटनेर तालुका जळगाव, खडकेसिम तालुका एरंडज्ञेल, तसेच हातगांव 1, खडकीसिम, पिंप्री उंबरहोळ, ब्राम्हण शेवगे, पिंपरखेड, वाघळा 1, कूंझर 2 तालुका चाळीसगाव, तसेच जळगाव जिल्हयातील अधिसूचित नदी नाले तसेच वरील प्रकल्पांचे जलाशय, नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.

सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात 31 डिसेंबर पर्यंत सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात, पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आलेली आहे. मुदती नंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच / ना मंजुरी चा विचार करण्यात येईल.
मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळालेशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश / पाळी नसतांना पाणी घेणे/ मंजुरी पेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे/ विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे/ व पाटमोट संबंध दूर न करणे वगैरे गुन्हे करणा-या बागायतदारांनी नियमानुसार पंचनामे करणेत येतील व दंडाचे दराने आकारणी करण्यात येईल.
टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजवण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणीवापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल. जळगाव जिल्हयातील मोठया प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी पाणी आरक्षित केलेले आहे. आरक्षित पाणीसाठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधीत उपविभागाव्दारे शेतीसाठी पाणीअर्ज स्वीकारले जातील असेही कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम