पावसामुळे डागाळलेल्या आंब्याचे असे करा व्यवस्थापन!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ एप्रिल २०२४ | सध्याच्या वातावरणात आंब्यावर मोठ्या प्रमाणात काळे डाग येण्याची दाट शक्यता आहे. सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. फळांचा राजा आंब्याचा मोसम सुरू असताना या पावसामुळे आंब्याच्या फळांवर डाग पडत आहेत. करपा रोगामुळे आंब्याच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. तसेच देठकूज या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील आहे.

अशा परिस्थितीत आंबा टिकण्यासाठी बुरशीनाशकाची फवारणी करणे उपयुक्त होईल, असा सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील तज्ज्ञांनी सांगितले. यासाठी काही विशेष उपाय सुचविले आहे.

शेतकर्‍यांनी अझॉक्सीस्ट्रॉबिन या बुरशीनाशकाची २३.५ ई.सी. १० मिली प्रति १० लिटर पाण्यात स्टिकर मिसळून फवारणी करावी.

आर्द्रतेमध्ये वाढ झाल्यामुळे २ फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी हेक्टरी ४ नग रक्षक सापळे वेगवेगळ्या ठिकाणी झाडांच्या खालील बाजूंच्या फांद्यावर लावावेत.

paid add

फळगळ झालेली आंबा फळे गोळा करून नष्ट करावीत आणि बागेत स्वच्छता ठेवावी.

तयार झालेली आंबा फळे काढताना सकाळी १० वाजेपर्यंत व सायंकाळी ४ नंतर नूतन झेल्याच्या सहाय्याने काढणी करावी.

काढणी पश्चात बुरशीजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी काढलेली फळे लगेचच ५० अंश सेल्सिअस पाण्यात १० मिनिटे बुडवून काढावीत व नंतर सावलीत वाळवावीत. तसेच फळांची वाहतूक करताना रात्रीच्या वेळीस करावी.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम