शेतकऱ्यांचा दसरा-दिवाळी देखील संकटात : विमा देण्यास नकार

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २१ ऑक्टोबर २०२३

देशभरातील शेतकऱ्यावर नेहमीच अनेक संकट येत असतांना यंदाच्या देखील दसरा-दिवाळीवर विरजण पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीच्या सणांसाठी पैसे लागतात. परंतु विमा कंपन्यांनी आगाऊ रक्कम नाकारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. सरकारने यावर त्वरित कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

paid add

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटीची 25 टक्के आगाऊ रक्कम देण्यास विमा कंपन्यांनी नकार दिल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दसरा-दिवाळीवर विरजण पडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसात खंड पडल्याने पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी पीक विम्याचे दावे फेटाळले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या दाव्यातून पळ काढण्यासाठी अनेक कारणे पुढे केले आहेत. काही कंपन्यांनी दावा अर्ज योग्यरित्या भरलेला नसल्याचे म्हटले आहे, तर काही कंपन्यांनी पिकाचे नुकसान नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नसल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने यासंदर्भात विमा कंपन्यांना निर्देश दिले आहेत. परंतु विमा कंपन्यांनी सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यास नकार दिला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम